अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना – मा. जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांनी पोलीस ठाणे आष्टी गु.र. नं. 246/2025 मधील आरोपी डॉ. समीरन निर्मल सरकार यास 20 वर्षे सश्रम कारावास व ₹44,000/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि आष्टी पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी साध्य झाली.
मोलमजुरी करणाऱ्या महिलेची 16 वर्षीय मुलगी 28 सप्टेंबर 2024 रोजी बेपत्ता झाली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्कालीन प्रभारी अधिकारी सपोनि सचिन इंगेवाड यांनी तपास पोउपनि अजित चाटे यांच्याकडे सोपवला. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासातून आरोपी व पिडीता उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे असल्याचे समजले.
पोलीस पथकाने 3 दिवसांत 3000 किमीचा प्रवास करून दुर्गम खेड्यातून पिडीतेची सुटका केली. पुढील तपास पोउपनि प्रदीप डोलारे यांनी पूर्ण केला. न्यायालयीन प्रक्रियेत मपोनि गणेश सुरवसे यांनी फिर्यादी व पिडीतेला साक्षीसाठी न्यायालयात हजर राहण्यास प्रोत्साहित केले.
शौर्याच्या रंगांनी सजलेली ओळी:
संकटाच्या सावलीत जे पाऊल पुढे टाकतात,
न्यायासाठी जीवाचे रान करून झुंजतात.
एसपी साहेबांचा निर्धार, पोलिसांची जिद्द,
अशा शूरवीरांमुळे न्याय होतो सिद्ध.
खंबीर नेतृत्व, न झुकणारी मान,
अजयकुमार बंसल यांचा पोलिसांवर अभिमान.
आष्टीच्या शूरवीरांनी दाखवली ताकद,
न्यायाच्या वाटेवर केली प्रकाशाची जागद.
या कामगिरीमुळे पिडीत बालिका व तिच्या गरीब कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून, पोलिसांची संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा समाजात आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.

Post a Comment
0 Comments