बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
दि. 14 ऑक्टोंबर रोजी शॉट सर्किट मुळे आग लागून तनवाडी - राहेरा येथील शेतकऱ्यांच्या ऊसपिकाचे ७० ते ८० एकर ऊसाचे नुकसान झाले.या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बांधावर जाऊन समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश राव घाडगे पाटील यांनी जाऊन पाहणी केली. कारखाना सुरू होताच जळीत उसाची तोड करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. तसेच महावितरण कडून जळीत उसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास सतीश घाडगे पाटील यांनी तनवाडी- राहेरा शेतकऱ्यांना दिला.

Post a Comment
0 Comments